शिवगंगा न्यूज नेटवर्क
खेडशिवापुर
डॉ मनमोहन सिंह (२६ सप्टेंबर, १९३२ – २६ डिसेंबर, २०२४) हे २२ मे २००४ पासून २६ मे २०१४पर्यन्त भारताचे पंतप्रधान होते. हे १४वे पंतप्रधान होते. ते काँग्रेस पक्षाचे सदस्य असून राज्यसभेत आसामचे प्रतिनिधित्व करत होते.
यापूर्वी ते इ.स. १९९१ साली पी.व्ही. नरसिंहराव मंत्रिमंडळात केंद्रीय अर्थमंत्री होते. त्या काळात त्यांनी केलेल्या आर्थिक सुधारणा आणि त्यानंतर झालेल्या आर्थिक प्रगतीमुळे त्यांची कार्यक्षम राजकारणी म्हणून प्रतिमा बनली.
एक्सीडेंटल प्राईम मिनिस्टर म्हणून त्यांची प्रतिमा निर्माण झाली होती मात्र एक जेष्ठ अर्थतज्ञ जेव्हा देशाचं नेतृत्व करतो त्यावेळी त्यांनी आपल्या बुद्धिमत्तेच्या जोरावर भारतीय अर्थव्यवस्थेला चालना मिळवून दिली आणि एक शांत संयमी आणि हुशार बुद्धिमान व्यक्ती ज्या वेळेस देशाचे नेतृत्व करतो त्यावेळेस देशाच्या विकासाला चालना मिळते.
या देशाला खऱ्या अर्थाने आर्थिक समुद्धी प्रदान करण्याचे मोलाचे योगदान असणारे जागतिक किर्तीचे अर्थतज्ञ ज्यांच्या आर्थिक धोरणामुळे तळागाळातल्या गरीब माणसांच्या हातात थोडी तरी आर्थिक सुबत्ता आली ….अश्या महान अर्थतज्ञ मा . पंतप्रधान मनमोहन सिंग यांना भावपूर्ण आदरांजली…..